Jay Lahuji

Friday 20 March 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 19 मार्च 2020 रोजी देशवासियांना संबोधलेल्या भाषणातील ठळक मुद्दे सर्व नागरिकांना समजावून सांगावे...

● कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी नागरिकांकडून सहकार्य आवश्यक आहे. संकल्प व संयम याद्वारे कोरोनाशी आपल्याला सामना करायचा आहे
● अजून कोरोना व्हायरस ला बरी करू शकेल अशी कुठली ही लस विकसित झाली नाही
● गरज नसल्यास लोकांनी घराच्या बाहेर निघू नये. पुढील काही आठवडे घरीच थांबावे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घरा बाहेर पडू नये.
● नियमित तपासणी किंवा अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया टाळा ज्याद्वारे अकारण वैद्यकीय व्यवस्थेवरचा भार कमी होऊन त्यांना कोरोनासाठी सज्ज राहता येईल
● रविवारी २२ मार्च २०२० ला सकाळी ७ ते रात्री ९ वाजे पर्यंत “जनता कर्फ्यू” पाळावा.
● तसेच रविवार २२ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता आपल्या दारावर / खिडक्या/ बाल्कनीत उभे राहून घंटानाद / टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी आपले आभार व्यक्त करावे.
● कोरोना व्हायरसचे देशाच्या अर्थव्यवस्थे वर होणाऱ्या परिणामांचा सामना करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
● अत्यावश्यक वस्तूंचा गरजे पेक्षा जास्त संग्रह करू नका. अत्यावश्यक वस्तूंची कमतरता उद्भवणार नाही याची काळजी सरकार घेत आहे.
● उच्च आर्थिक वर्ग, कंपन्या, व्यापारी यांनी कर्मचारी वर्गाला पगारी सुट्ट्या द्याव्या. त्यांचे आर्थिक नुकसान न होण्याची काळजी माणुसकीच्या दृष्टीने घ्यावी

#JanataCurfew #IndiaFightsCorona #NNMCFightsCorona #Coronavirus #Covid19
#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

No comments:

Post a Comment