Jay Lahuji
Thursday 25 January 2018
राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे लोकशाहीला बळकट करणारा दिवस. प्रत्येक व्यक्तीने आपला मतदान करण्याचा अधिकार हा वापरलाच पाहिजे. हल्ली राजकीय तसेच सामाजिक अनास्थेमुळे मतदान न करण्याकडे जनतेचा कौल दिसतो. पण ही उदासिनता झटकून मतदानाचा हक्क बजावूनच आपण सत्तांतर करू शकतो. सजग नागरिकांनो जागे व्हा आणि आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा!!!
#NationalVotersDay2018
#NationalVotersDay2018
Monday 15 January 2018
http://ambujprahar.com/?p=1708
जय लहुजी सामाजिक संस्थेने दिली उपेक्षीतांना मायेच्या चादरीची उब
अंबुज प्रहार न्युज लाईव्ह ..
जय लहुजी सामाजिक संस्थेने दिली उपेक्षीतांना मायेच्या चादरीची उब
अंबुज प्रहार न्युज लाईव्ह ..
'भारतीय लष्कर दिन' दरवर्षी १५ जानेवारीला अविस्मरणीय उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याच्या अजिंक्य धैर्याचे पुन्हा स्मरण करण्यासाठी हा दिवस भारतात साजरा केला जातो.
या वीरांना माझा सलाम!!
#IndianArmyDay #IndianArmy #15January #RealHeros
या वीरांना माझा सलाम!!
#IndianArmyDay #IndianArmy #15January #RealHeros
जय लहुजी सामाजिक संस्थेचे कु.योगेश अभंग शिंदे व समाजसेवक श्री.महेश ठाकूर यांच्या कडून गोरगरिबांना चादर वाटप
नवी मुबंई :- इतरांना काही देण्यासाठी आधी मन मोठं असावं लागतं, सहृदय असावं लागतं. समोरच्याने स्वत:ची गरज बोलून न दाखवताही ती लक्षात येण्यासाठी संवेदनशीलता सजग असायला हवी. गरजूला मदतीचा हात देऊन त्याला उभारी देण्यात, त्याच्या आयुष्यात आनंद फुलवण्यात जे समाधान मिळतं, त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही.
जय लहुजी सामाजिक संस्थेचे कु. योगेश शिंदे साहेब व समाजसेवक श्री.महेश ठाकूर साहेब यांच्या वतीने ठाणे परिसरात थंडीत कुडकुडणाऱ्या गरजू लोकांना चादरीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री.शनी डिसोझा( उर्फ मामा), श्री.लॅन्सी ब्रिट्टो, श्री.दिलीप शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.
जय लहुजी सामाजिक संस्था ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या आधीही या संस्थेने अनेक सामाजिक कामात आपला सहभाग नोंदवला आहे. वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. समाजातील अनेकांना थंडीपासून रक्षण करण्यासाठी पुरेसे पांघरुण नसते. ही गोष्ट लक्षात घेत येथील सामाजिक कार्यकर्ते कु.योगेश शिंदे साहेब व श्री.महेश ठाकूर साहेब यांनी चादरी खरेदी करून गरजूंना चादरी भेट दिल्या. या पुढे ही असे सामाजिक उपक्रम घेण्यात येतील असे प्रतिपादन श्री.योगेश शिंदे यांनी केले.
Monday 1 January 2018
भिमा कोरेगावच्या घटनेला या वर्षी 200 वर्ष पूर्ण होत आहे.या द्विशताब्दी वर्षानिमित्त भिमाकोरेगावच्या क्रांतिभूमीला मी नमन करतो
1 जानेवारी 1818 भिमा कोरेगाव येथे झालेल्या 500 महार सैनिक तसेच 28,000 ब्राह्मण-पेशवा यांच्यामध्ये झालेल्या लढाईस 1 जानेवारी 2018 रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्या शूरवीर सैनिकांना मानवंदनेसह विनम्र अभिवादन.
जयभिम...👏👏👏
1 जानेवारी 1818 भिमा कोरेगाव येथे झालेल्या 500 महार सैनिक तसेच 28,000 ब्राह्मण-पेशवा यांच्यामध्ये झालेल्या लढाईस 1 जानेवारी 2018 रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्या शूरवीर सैनिकांना मानवंदनेसह विनम्र अभिवादन.
जयभिम...👏👏👏
Subscribe to:
Posts (Atom)